"मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमच मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही" असं सांगत इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलं आहे. सोबत कोरोना परिस्थितीवर खळबळजनक विधान केले या वक्तव्यामुळं ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की "मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमच मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही" असं सांगत इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री राज्यात पूर्ण लसीकरण व्हावं यावर भर देत आहेत. तेथे इंदुरीकर महाराजांच हे वक्तव्य विरोधाभास निर्माण करणार आहे.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य