५० कोटींचा आकडा पार करण्यासाठी आणखी २० दिवस लागले.
देशात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लस हाच पर्याय असून देशात लसीकरण जोरदार सुरु आहे. देशात आज लसीकरणाची संख्या ५० कोटी पार झाली आहे. हि माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सामाजिक माध्यमावरून दिली. ते म्हणाले की, भारताने कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे मोठं यश मिळवले आहे. सर्वांचे अभिनंदन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार. आरोग्य मंत्री म्हणाले की, लस १० कोटीं टप्पा गाठण्यासाठी ८५ दिवस लागले. २० कोटीं पार करण्यासाठी ४५ दिवस, ३० कोटींवर पोहोचण्यासाठी २९ दिवस, ४० कोटींवर पोहोचण्यासाठी २४ दिवस आणि ५० कोटींचा आकडा पार करण्यासाठी आणखी २० दिवस लागले. लसीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ह्या टप्प्यानंतर आपण लसीकरणाची गती सुरू ठेवू आणि सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरच पूर्ण करू आणि कोरोना संकट घालवू. ६ ऑगस्ट शुक्रवारी संध्याकाळी ७ पर्यंत ५०.०३ कोटी डोस दिले गेले आहेत. याच दिवशी ४३.२९ लाखांहून अधिक लस देण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार , आजपर्यंत १८-४४ वयोगटातील १७.२३ कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि १.१२ कोटींना दुसरा डोस मिळाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यांमध्ये या वयाच्या लोकांना एक कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य