मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

संविधान तुमची ढाल आहे.पण ती सांभाळण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
27 January 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

माझ्या प्रिय देश बांधवानो,शोषित आणि वंचित समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या नवजात राष्ट्राच्या नागरिकांनो जागे व्हा! सविधान, ही तुमची ढाल आहे पण ती धरून ठेवण्याची ताकद तुम्ही एकवटली पाहिजे. आज मी इथे उभा असताना माझ्या हातात असलेले हे भारतीय संविधान केवळ पानाचा गठ्ठा नाही. ते माझ्या घामाने,माझ्या रक्ताने, माझ्या निद्रानाशाच्या रात्रीने आणि हजार वर्षापासून माझ्या समाजाच्या अश्रूचे सार आहे.आज माझे हृदय आनंदाने नाही तर चिंता आणि जबाबदारीच्या भावनेने देखील भरलेले आहे.मी तुम्हाला खुश करण्यासाठी गोड शब्द बोलणार नाही. आज मी तुम्हाला झोपी जाण्यासाठी लोरी म्हणायला आलो नाही .उलट तुम्हाला जागे करायला आलो आहे. कारण आपल्या समाजाने शतकानुशतकेची झोप अनुभवली आहे. त्याची किंमत आपण आपल्या गुलामगिरीतून चुकवली आहे. भारतीय संविधान तयार करण्याच्या वेदना संघर्षाशी आज आपण आनंदी आहोत की आपल्याला हक्क मिळाले आहेत आपण आता मुक्त आहोत याचे कौतुक करणार आहोत पण स्वातंत्र्याचा हा दस्तऐवज,समानतेचा दस्तऐवज तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी मला कोणत्या आगीतून जावे लागले हे तुम्हाला माहित आहे का ?
जेव्हा मी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलो तेव्हा मी ती जबाबदारी स्वीकारली. पण मला माहित होते.तो काट्यांचा मुकुट होता मी आजारी होतो. माझे शरीर कमकुवत होत होते. डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. माझी दृष्टी कमकुवत होत होती. मधुमेह माझ्या शरीराला आतून पोकळ करत होता .पण माझ्यासमोर फक्त तुमची प्रतिमा होती. ते म्हणजे गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी मारहाण झालेल्या त्या पिढीत व्यक्तीची, जिच्या मुलाला वर्गाबाहेर अभ्यासासाठी बसवण्यात आले होते.मी रात्रभर जागा राहतो जेव्हा संपूर्ण दिल्ली झोपली होती .तेव्हा माझा दिवा जळत राही.
*माझ्या मनात फक्त एकच भीती होती. जर मी आज चूक केली, जर आज माझी लेखणी थांबली किंवा आज मी एक चुकीचा शब्द लिहिला तर माझ्या भावी पिढ्या पुन्हा एकदा गुलामगिरीच्या साखळी दंडात जखडल्या जातील.
माझा अपमान झाला .मला देशद्रोही म्हटले गेले. मी केलेल्या प्रत्येक प्रस्तावावर बोटे उचलली गेली.मला प्रत्येक पावलावर थांबवले गेले.पण मी थांबलो नाही. का? कारण मला माहित होते मी एकटा नाही.माझ्या लेखणीने लाखो आवाजहीन लोकांचा आवाज उचलला.आज तुम्हाला समान हक्क देणारे हे सविधान. मी माझ्या आयुष्यातील काही वर्ष बलिदान देऊन तयार केले. तुम्ही डोके वर करून चालावे म्हणून मी माझे आरोग्य बलिदान दिले. आता हे संविधान काय आहे त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे ते जाणून घ्या .काळजीपूर्वक ऐका आणि ते तुमच्या हृदयात जपून ठेवा.
हजारो वर्षापासून या देशात एक वेगळा कायदा प्रचलित होता मनू चा कायदा. एक असा कायदा ज्यामध्ये म्हटले होते ,की ,सर्व माणसे समान नाही .काही जण डोक्यातून जन्माला आले .काही जण पायातून जन्माला आले. काहींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता तर काहींना फक्त सेवा करण्याचा. मी तो कायदा जाळून टाकला आहे आणि तुम्हाला नवीन कायदा दिला आहे ते हे नवीन संविधान दिला आहे. हे संविधान काय करते हे तुम्हाला प्रजेपासून नागरिक बनवते. काल पर्यंत तुम्ही राजाचे प्रजा होता. जमीनदाराचे गुलाम होता. आज पासून संविधानाच्या अंमलबजावणीमुळे तुम्ही या देशाचे मालक आहात.समानतेचा अधिकार आता तुम्हाला मिळाला आहे आता कोणी राजा असो की गरीब असो कोणी ब्राह्मण असो की शूद्र असो कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत गरीब व्यक्तीला मिळणारी शिक्षा श्रीमंत व्यक्तीसारखीच आहे मतदानाचा अधिकार हे माझे सर्वात मोठे शस्त्र आहे जे मी तुम्हाला दिले आहे.
राणीच्या पोटातून राजाचा जन्म होणे हे युग संपल आहे. आता राजा तुम्ही निवडलेला असेल.तुमचे एक मत देशाच्या पंतप्रधानाच्या मता इतकेच आहे. ते कधीही विकू नका.हे प्रतिष्ठेचे जीवन. हे संविधान फक्त तुम्हाला अन्न वस्त्र देत नाही तर ते तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते आता कोणी तुम्हाला अस्पृश्य म्हणून तुमचा अपमान करू शकत नाही.जर कोणी असे केले तर संविधान तुमच्या हातातील ढाल आहे. त्याच्या साह्याने तुम्ही कायदेशीर लढा ही लढू शकता. मी या संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे बीज पेरले आहे लक्षात ठेवा समते शिवाय स्वातंत्र अपूर्ण आहे आणि बंधुत्वाशिवाय दोन्ही निरूपयोगी आहेत. मी तुम्हाला असे घर बांधले आहे ज्याचा पाया न्यायावर आहे आता हे घर सजवणे व राखणे तुमचे काम आहे.आजच्या भाषणाचा सर्वात मोठा भाग आहे. मी तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो. संविधान किती चांगले असले तरी त्याचे व्यवस्थापन करणारी लोक वाईट असले तर संविधान शेवटी वाईट सिद्ध होईल. आणि संविधान कितीही वाईट असले तरी त्याचे व्यवस्थापन करणारी लोक चांगले असले तर ते चांगले सिद्ध होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात मला तीन धोक्यांची भीती वाटते की तुम्ही त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे.
पहिला धोका म्हणजे राजकीय लोकशाही विरुद्ध सामाजिक लोकशाही. 26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधीभासी जीवनात प्रवेश करू. राजकारणात आपल्याला समानता मिळेल.एक व्यक्ती एक मत.पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात अजूनही असमानता आहे. श्रीमंत राजवाड्यात राहतात.तर गरीब झोपडया मध्ये राहतात.उच्च जाती आणि कनिष्ठ जातीमधील भेद अजूनही अस्तित्वात आहे.जर आपणही सामाजिक असमानता लवकरच दूर केली नाही तर ज्यांना याचा त्रास सहन करावा लागतो ते एक दिवस आपण इतक्या कष्टाने बांधलेल्या राजकीय लोकशाहीच्या रचनेलाच उडवून देतील. म्हणून फक्त मतदान करून समाधान मानू नका .समाजात बंधूंना पुन्हा संचयित होईपर्यंत लढा चालू ठेवला पाहिजे
दुसरा धोका म्हणजे भक्ती आणि अंधश्रद्धा. ही भारताची सर्वात मोठी कमकुवता आहे.धर्मात भक्ती हा आत्मामुक्तीचा मार्ग असू शकतो पण राजकारणात भक्ती हा अधोगती आणि हुकूमशाहीचा थेट मार्ग आहे.कोणत्याही नेत्याला, अगदी मला ही इतके महान बनवू नका, की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करणे थांबवा.कोणताही माणूस इतका महान नाही. आपण त्याच्यासाठी आपले स्वातंत्र्य गहाण ठेवावे जर तुम्ही नेत्यांची पूजा केली तर तुम्ही पुन्हा स्वतःला गुलाम कराल. प्रश्न विचारायला शिका .तुम्ही तुमची बुद्धी वापरा. नायक पूजा टाळा .कारण ती लोकशाहीचा नाश करते.
तिसरा धोका म्हणजे तुमचे मार्ग सोडू नका जोपर्यंत आपल्याकडे संविधान नव्हते तेव्हा सत्याग्रह केला.रस्ते अडवले. कायदे मोडले.ते सर्व ठीक होते.पण आता आपल्याकडे संविधान असल्याने आपण अराजकतेचे व्याकरण संपवले पाहिजे .आपला मुद्दा मांडण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू नका. रस्ते अडवू नका संविधानिक मार्गाने लढायला शिका.न्यायालयाचे दरवाजे ठोठवा. संसदेत आवाज उठवा. जर तुम्ही कायदा स्वतःच्या हातात घेतला तर तुमचे रक्षण करणाऱ्या संविधानाला कमकुवत कराल.
भविष्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझे काम केले आहे.मी तुम्हाला चावी दिली आहे.ज्यामुळे तुम्ही तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकता पण लक्षात ठेवा.तुम्ही स्वतः दार उघडून आज जावे.मी आता म्हातारा होत आहे. माझे शरीर थकत आहे. मी कदाचित तुमच्या मध्ये जास्त काळ राहणार नाही पण या गोष्टीचा मला दिलासा आहे कि, मी शतकानुतके चिखलात अडकलेला रथ योग्यरीत्या उभा केलाय तो बाहेर काढून फक्त रस्त्यावर ठेवला आहे आता तो रथ पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही तो पुढे नेऊ शकत नसाल तर मागे जाऊ देऊ नका. शिक्षित व्हा. फक्त पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका तर बरोबर आणि चूक ओळखण्यासाठी सक्षम व्हा. एकजूट राहा.जातीमध्ये विभागलेले राहू नका .तुमची ताकद तुमच्या एकतेत आहे.जर तुम्ही विखुरलात तर तुम्हाला पुन्हा चिरडले जाईल. लढा. अन्याया विरुद्ध कधी गप्प बसू नका. हे संविधान तुम्हाला सिंह बनवेल.आता मेंढ्या सारखे रडणे थांबवा .तुमच्यात या देशाचा शासक समुदाय बनण्याची क्षमता आहे. बाबासाहेब शेवटी म्हणतात आज हसा कारण तुमच्या पायातील बेड्या तुटल्या आहे.आज आनंदी राहा कारण आता तुमची मुले कोणासमोर भीक मागणार नाहीत. तर त्यांच्या डोळ्यात पाहतील.आज अभिमान बाळगा कारण तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान तुमच्या हातात धरले आहे पण माझा इशारा लक्षात ठेवा. हक्क ही अशी गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला दे.ते हक्क अशी गोष्ट आहे की कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण तुमच्या जीवापेक्षाही जास्त करा. मी तुम्हाला एक प्रबुद्ध भारताचे स्वप्न देऊन जात आहे हे स्वप्न पूर्ण कराल का ? संविधानाचे रक्षण कराल का? उठा! जागे व्हा! तुमची गमावलेली प्रतिष्ठा पूर्णपणे परत मुळे मिळेपर्यंत थांबू नका

Previous Post

मोढा येथे जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगला स्वातंत्र्याचा देखावा…

Next Post

भारतीय राज्यघटनेच्या बळावरच देश कणखरपणे उभा

Related Posts

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी
ताज्या बातम्या

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

27 January 2026
ताज्या बातम्या

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

27 January 2026
‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम
छत्रपती संभाजीनगर

‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

27 January 2026
Next Post
भारतीय राज्यघटनेच्या बळावरच देश कणखरपणे उभा

भारतीय राज्यघटनेच्या बळावरच देश कणखरपणे उभा

अज्ञाताने आग लावून मका जाळली;-गलवाडा शिवारातील घटना

अज्ञाताने आग लावून मका जाळली;-गलवाडा शिवारातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

27 January 2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

27 January 2026
‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

27 January 2026
गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

27 January 2026

Recent News

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

27 January 2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

27 January 2026
‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

‘संस्कार दशसूत्रीचे-रंग राष्ट्रभक्तीचे’ अंतर्गत जिल्ह्यात विश्वविक्रम

27 January 2026
गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

27 January 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

रमजान व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांसाठी लोकन्याय विकास आघाडीची महापालिकेकडे मागणी

27 January 2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

27 January 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134