मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home Breaking News

सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा समावेश

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
28 January 2026
in Breaking News, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुख्य शहरे, लातूर
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

लातूर, दि. २7 : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) मार्फत करण्यात आले. या अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी कार्यालयांची नावे राज्य शासनामार्फत प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचाही समावेश असून यानिमित्ताने लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमांची यानिमित्ताने राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील प्रशासनिक कार्यालयांसाठी १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित व नागरिकाभिमुख करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ जून २०२५ पासून या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली होती. प्रामुख्याने संकेतस्थळ सुधारणा, सेवा हमी कायदा (आरटीएस), ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, व्हाटसअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि जीआयएस व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा समावेश होता.

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

संकेतस्थळ झाले अद्ययावत; २३ भाषेत माहिती उपलब्ध

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा, अंतर्गत कामकाज यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर २३ भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध महत्वाची संकेतस्थळे, समाज माध्यमे या संकेतस्थळाला जोडण्यात आली. नागरिकांना तक्रार व अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. हे संकेतस्थळ मोबाईलवर सहज वापरता यावे, यादृष्टीने रचना करण्यात आली. नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणारी रचना व माहिती यामुळे आतापर्यंत ५ लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.

ई-ऑफिसमुळे कामकाज गतिमान; सेवा जलद

सेवा हमी कायदा अंतर्गत ४ लाख ९२ हजार अर्जांपैकी ९७.९३ टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात आल्याने नागरिकांना जलद सेवा मिळाली. अहवाल कालावधीत ई-ऑफिस प्रणालीद्वारे ७२ हजार ६७१ ई-फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण ७६ हजार ८७८ ई-फाईल निकाली काढण्यात आल्या आहेत, त्यामुळे फाईल निपटाऱ्याचा कालावधी लक्षणीयरीत्या होवून कामकाज गतिमान झाले. यासोबत डॅशबोर्ड आधारित निर्णयप्रणालीमुळे कार्यालयीन कामकाजाचा ऑनलाईन आढावा घेणे शक्य झाले आहे.

कार्यालयीन कामकाजासाठी ‘एआय’ची मदत; वेळत बचत

जिल्हाधिकारी कार्यालय व अधिनस्त उपविभागीय, तहसील कार्यालयांच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वापर वाढविण्यावर या उपक्रम काळात भर देण्यात आला. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात आला. कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा सुरु झाल्याने निर्णय प्रक्रियेतील वेळेची बचत होत असून कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात येणारे विविध मसुदे अचूक होण्यास मदत झाली आहे. तसेच, व्हाटसअप चॅटबॉटद्वारे ५० सेवा नागरिकांना व्हाटसअपवर उपलब्ध झाल्या असून नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक सेवांबाबत माहिती, तसेच विविध शासकीय सेवांबाबत तक्रार नोंदवणे, तक्रारीची स्थिती तपासणे आणि अद्ययावत माहिती मिळविणे सोईचे झाले आहे. या सर्व बाबींच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात लातूर जिल्ह्याने एकूण १७९.२५ गुण प्राप्त करून राज्यातील पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांच्या समन्वयातून उत्कृष्ट कामगिरी

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे, महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रिजवान मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत सर्वच शाखांतील अधिकारी, कर्मचारी यांनी १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामिगिरी केली.

‘टीम वर्क’मुळे चांगली कामगिरी शक्य झाली : जिल्हाधिकारी

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित व नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या महत्त्वाकांक्षी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे, ही समाधानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या ‘टीम वर्क’मुळे या उपक्रम कालावधीत नागरिकांसाठी चांगले काम करता आले. या कामाची दखल घेवून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या. नागरिकांसाठी गतिमान व पारदर्शक सेवा देण्यासाठी यापुढेही विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला मिळालेला सातवा पुरस्कार

लातूर जिल्ह्याला गेल्या सुमारे तीन वर्षांत मिळालेला हा सातवा राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरील पुरस्कार ठरला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मिळालेला लोकसत्ता आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सकडून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा जिल्हा निर्देशांक पुरस्कार, सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामिगीरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार, दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत स्कॉच अवार्ड, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘निर्यात पुरस्कार २०२५’, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

१५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांची उत्कृष्ट कामगिरी

पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या शासकीय सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नगरपालिका गटात निवड झालेल्या राज्यातील १७ पैकी ९ नगरपालिका या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व चारही नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे मार्गदर्शन व जिल्हा नगरपालिका प्रशासन सहआयुक्त अजितकुमार डोके यांच्या नियोजनातून उदगीरक, अहमदपूर, निलंगा व औसा या ४ नगरपालिका यांना ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

Previous Post

१५० दिवसांचा कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श ; जिल्हा राज्यात तृतीय

Next Post

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

Related Posts

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…
आरोग्य व शिक्षण

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

28 January 2026
माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.
Breaking News

माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

28 January 2026
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.
ताज्या बातम्या

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

28 January 2026
Next Post
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

केशरी पगडी, एक हाक… आणि न संपणारी आठवण

केशरी पगडी, एक हाक… आणि न संपणारी आठवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

28 January 2026
माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

28 January 2026
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

28 January 2026
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

28 January 2026

Recent News

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

28 January 2026
माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

28 January 2026
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल.

28 January 2026
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

28 January 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

बार्टी तर्फे मेघा पवार यांना कोकण विभागाचे उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून महाड येथे गौरव…

28 January 2026
माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

माधवीताई सारखी आंबेडकरी विचारांवर निष्ठा हवी.

28 January 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134