छत्रपती संभाजीनगर: रमाईंचे सामाजिक मातृत्व व्यापक दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे, त्या कणखर होत्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या बरोबर सामाजिक संघर्षात योगदान दिले असे मत डॉ. मंजूश्री लांडगे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रमाबाई आंबेडकर अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहात शनिवारी (दि.सात) आयोजित रमाई जयंतीच्या कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. रमाईंचा संघर्ष हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नव्हता तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनात त्यांचाही सहभाग तितकाच महत्वपूर्ण होता असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले. रमाई कणखर व खंबीर होत्या तसेच त्यांचे कार्य कुटुंब आणि राज्याच्याही पुढे जात देशभरातील उपेक्षित वर्गाच्या हक्कधिकाराच्या लढाईला बळ देणारे होते त्यामुळे त्यांना भारतातील तमाम उपेक्षित वर्ग आपली राष्ट्रमाता मानतो असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रा. अश्विनी मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गौरी कल्लावार, प्रा. प्रवीणा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रमाई जयंती निमित्ताने वसतिगृहातील मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात भित्तिपत्रक, घोषवाक्य, संगीतखुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. यावेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला,
भित्तीपत्रक स्पर्धा :
प्रथम- निकिता फफाळ
द्वितीय-आकांक्षा मल्हारे
तृतीय- संस्कृती खंदारे
घोषवाक्य स्पर्धा :
प्रथम- साक्षी तोष्णीवाल
द्वितीय- अपेक्षा जावरे
तृतीय- नम्रता साळवे
संगीतखुर्ची स्पर्धा :
प्रथम- संस्कृती खंदारे
द्वितीय- दीक्षा शिनगारे
तृतीय- श्रूती खरात
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती खंडारे यांनी केले तर आभार अपेक्षा जावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी सरला वाकळे, प्रभा भिंगारे, मीना शेजवळ, वर्षा अहिरे, मनीषा गायकवाड यांनी प्रयत्न केले.
















