एकवीस कविंचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवास काव्यवाचन स्पर्धेने गुरुवारी (दि.१२) सुरुवात झाली. स्वलिखीत काव्यवाचन स्पर्धेत एकविस जणांनी सहभाग घेतला. बहुसंख्य कवींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर कविता सादर केल्या. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. विद्यार्थी कल्याण विकास मंडळाचे संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख अध्यक्षस्थानी होते.
काव्यवाचन स्पर्धेत गायत्री अधाने, प्रकाश ढाले, दिपाली भूतेकर, सार्थक मोटे, गणेश विणकरे, सुकन्या अशोक, आकाश जाधव, मेघा सोळुंके, गजानन मगर, सांची कोलते, पूनम झोरे, विकी शेजवळ, किरण अंभोरे, वैभव क-हाळे, विशाल थोटे, अम्रता आव्हाळे, साक्षी ताष्णीवाल, अल्लास शेख, शितल कदम, गीता राऊत, दिपाली सुलताने यांनी सहभाग घेतला. कवि डॉ.ललित अधाने व डॉ.शशिकांत पाटील यांनी कवी स्पर्धेचे परीक्षण केले. तर कवी धम्मपाल जाधव यांनी बहरदार सूत्रसंचालन केले. वैभव कराळे यांनी आभार मानले.या स्पर्धेत अमृता आव्हाळे, सांची कोलते, वैभव क-हाळे व गायत्री अधाने यांना पारितोषिके जिंकली. ’बाजार माणसांचा भरलेला पहिला मी’ या डॉ.ललित अधाने यांच्या कवितेने काव्यवाचन स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
यावेळी सहयाद्रिचा सिंह – कवि गीता राऊत हीने सादर केली.
सहयाद्रीच्या कुशीत जन्मला, तेजस्वी तो बालवीर I
जिजाऊंच्या संस्कारांनी झाला स्वराज्याचा धनी धीर I
तोरणा जिंकूनी उभारला स्वराज्याचा पाया I
अन्यायाचा अंधाराला दिला धैर्याचा दिवा जळाया I
जन भवानी जय शिवाजी गुंजे आजही डोंगरदरी I
शिवरायांच्या स्मृतीने उजळली भारतभूमी सारी I
ही कविता सादर केली. प्रश्नमंजूषा स्पर्धेत ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ.विजय पांडे यांनी परीक्षण तर शितल कदम हिने सूत्रसंचालन केले.















