छत्रपती संभाजीनगर – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराज यांच्या मानवतावादी विचारधारेला व कार्यकर्तृत्वास दि अनटचेबल हे पुस्तक अर्पण केले होते, तसेच दिनांक १५ फेब्रुवारी १९५३ मध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती, त्याअनुषंगाने आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त मानवतावादी संत रविदास या विषयावर परिसंवादाचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी संत रविदास भवन, रोहिदासपुरा भवानीनगर, जुना मोढा येथे करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावणदादा गायकवाड हे होते तर रमेश विटोरे यांनी तथागत गौतम बुद्ध, संत रविदास महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुल व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाघाटन केले, त्यांनी आपल्या ऊदघाटकिय भाषणामध्ये संत रविदास महाराजांच्या मानवतावादी विचारधारेबाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली, तसेच अध्यक्षिय समारोप करताना श्रावणदादा गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, रविदास महाराजांच्या आई, वडिलांवर रैवतप्रज्ञ बौद्ध भिक्खूचा प्रभाव होता म्हणून त्यांचे नाव रैदास ठेवण्यात आले होते, त्यांनी आपल्या दोहयाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, कर्मकांड,जातिय ऊच निचता व ब्राह्मणवादी व्यवस्थेवर प्रहार केले त्यामुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढल्याने कपट व छळनितिने त्यांचा ६ मार्च १५२८ मध्ये ब्राम्हणवादयानि खुन केला तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवर व त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धाच्या मानवतावादी विचारधारेचा फार मोठा प्रभाव होता म्हणून त्यांनी हयातभर दोहयाच्या माध्यमातून मानवतावादाचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळे संत रविदास महाराज मानवतावादी होते, त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे मानवजातीने अनुकरण असे आवाहन गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना केले आहे.
यावेळी रामराव दाभाडे, प्रा.अरुण कांबळे, प्रा. डॉ.बाळासाहेब अंभोरे, शिवाजी कांबळे, रोहिदास गोरमे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवर व उपस्थितांचे स्वागत बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन स्वागताध्यक्ष रामेश्वर ऊदे, अक्षय जिनवाल यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गोरमे यांनी केले असून सुत्रसंचलन सोमनाथ वाघमारे यांनी केले तर हिरालाल काटोटे यांनी आभारप्रदर्शन करून समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जाटवे, विनोद कासारे, अमर गोरमे, हर्षद गोरमे, राजु काकडे राजु गरडवाल, संतोष आकोदे, बाळु बेडवाल, कन्हैया गोरमे,सोनु गोरमे आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी भाई एस एस जमधडे, उत्तम जाधव, रामभाऊ पेटकर,जिवन दुर्बे, भगवान टिके, अशोक पदमे, अनिल सदाशिवे, किशोर गडकर, संतोष मोकळे, रमेश डोंगरे, गुणरत्न सोनवणे,सुरज पाखरे, दिपक सरोदे, भगवान सातपुते, रतनलाल कस्तुरे, प्रेम राठोड, राहुल गोरमे, चेतन पवार, सुनील जाटवे, योगेश जाटवे, विष्णू खरे, निलेश बरथरे, दिनेश ईळतवार, अनिल धांडे, मनिष शेळके , बाबासाहेब शिंदे, संतोष ससाणे, संदिप पेटारे, आकाश भालेराव, आशिष पाखरे, बंटी पाखरे, आदिनाथ आदमाने, प्रा. कीर्तीलता पेटकर ,जया गजभिये, निर्मला भालेराव, प्राची कस्तुरे, ज्योती कस्तुरे , रेणुका गोरमे, माधुरी गोरमे, मनिषा गोरमे, आशा गोरमे ,पचशिला सरोदे आदिंची उपस्थिती होती.
















