छत्रपती संभाजी नगर: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी क्षेत्रातील प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 (जीपीएसीएसआर)प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण, समुदाय विकास आणि सर्वसमावेशक वाढ यासाठी कंपनीने सातत्याने केलेल्या वचनबद्ध प्रयत्नांची ही दखल आहे.
गोल्डन पीकॉक पुरस्कारांची स्थापना इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी केली असून, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एचआर उत्कृष्टता आणि नवोन्मेषी व्यवस्थापन पद्धती या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याचा गौरव या पुरस्कारांद्वारे केला जातो. हा पुरस्कार चार्ली जेफरी, कुलगुरू आणि अध्यक्ष, यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क, यूके यांच्या हस्ते मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित 20व्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी परिषदेत प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना विक्रम गुलाटी, कंट्री हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट – कॉर्पोरेट अफेअर्स अँड गव्हर्नन्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी सांगितले, “मोजता येण्याजोग्या परिणामांसह आमच्या शाश्वत आणि अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आमच्या कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहे, जी आमच्या समुदायाभिमुख उपक्रमांच्या रचना आणि अंमलबजावणीला दिशा देते. सर्वसमावेशक वाढ, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींबाबतचे आमचे प्रयत्न ठोस मूल्यनिर्मिती करत आहेत, याची ही मान्यता आहे आणि ‘क्रिएटिंग मास हॅपिनेस फॉर ऑल’ या टोयोटाच्या तत्त्वज्ञानाला पुढे नेणारी आहे.”
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद उदय यू. ललित,भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती, यांनी भूषविले होते. त्यांच्या सोबत इतर मान्यवर व्यक्तींनी अंतिम उमेदवारांची निवड केली. 2025 साठी गोल्डन पीकॉक पुरस्कार सचिवालयाने सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी उपक्रमांसह मोठ्या संस्था आणि लघु-मध्यम उद्योगांकडून अर्ज मागवले होते. यावर्षी विविध श्रेणींमध्ये 447 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. कठोर तीन-स्तरीय मूल्यमापन प्रक्रियेनंतर विविध उद्योग क्षेत्रांतील 157 अर्ज अंतिम मूल्यांकनासाठी निवडले गेले.
2001 पासून टीकेएम शिक्षण, पर्यावरण, रस्ते सुरक्षा, कौशल्य विकास, आरोग्य व स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत समुदाय उन्नतीसाठी कार्यरत आहे. ‘चाइल्ड टू कम्युनिटी’ या दृष्टिकोनातून कंपनी स्थानिक गरजांवर आधारित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवते, जे दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक परिणाम घडवून आणतात आणि जबाबदार व शाश्वत विकासासाठीची तिची बांधिलकी अधिक दृढ करतात.
















