बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.मा धर्मपालजी मेश्राम यांची बुलडाणा जिल्हात अधिकृत सुनावणी दौरा 27, 28 जानेवारी राजी होता त्यावेळी बुद्धिस्ट समन्वय समिती बुलडाणाच्या वतीने 27 जानेवारीला शासकीय विश्राम भवन विसावा सावित्री बुलढाणा येथे सदिच्छा भेट घेण्यात आली व सर्व उपस्थितांचा परिचय भैयासाहेब पाटील यांनी करून दिला.त्यानंतर बुलडाणा बौध्द समन्वय समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागासवर्गीय समाजासमोरील काही ठराविक व ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी याबाबत समन्वय समितीने आपली स्पष्ट भूमिका मांडली.
मा.ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सर्व विषय अत्यंत संयमाने व संवेदनशीलतेने ऐकून घेतले व संबंधित प्रश्नांवर सकारात्मक मार्गदर्शन केले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काही महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय,धार्मिक घडामोडींवरही सुसंवादी चर्चा झाली. संविधानिक मूल्ये, समता, बंधुता व सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी दैनिक सम्राट जिल्हा प्रतिनिधी तथा रिपाई आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, भारतीय जय भीम संघटना चे अध्यक्ष तथा भीमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब पाटील, वंचितचे बुलडाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखडे,परिवहन मजूर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा निळे वादळ सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे, सुरेश सरकटे, प्रेम इंगळे, सामाजिक कार्यकर्ते विजय काळे, धम्म उपासीका काळे ताई, मराठा नेते रामराव शिंदे, लोकराजा अर्बनचे दादाराव पगारे,सामाजिक कार्यकर्ते पी.आर.इंगळे, सेवानिवृत्त पोलीस सबइन्सपेक्टर मिसाळ ,महाबोध्दी विहारचे सचिव इंगळे ,सौं जाधव ताई उपस्थित होते व समाजबांधवांनी ॲड.मेश्राम साहेबांचे स्वागत केले. यादरम्यान बौद्ध समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि शासकीय योजनाची अंमलबजावणी योग्यपणे होण्यासाठी मेश्राम यांचेकडे मागणी केली.
आश्वासन दिले की, मला कोणत्याही मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाला तर लेखी तोंडी कळवावे त्याची मी त्वरीत दखल घेईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
















