वैजापूर – माता रमाई या केवळ दुःखी स्त्री म्हणून नव्हे तर लढणाऱ्या, धैर्यवान आणि स्वाभिमानी स्त्री होत्या त्यागातून, संघर्षातून घडलेली कणखर स्त्री तथा प्रेम,संयम व समर्पणाची जिवंत प्रतिमा म्हणजेच माता रमाई होय असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.आबासाहेब कसबे यांनी केले ते वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे संविधान युवा मंचच्या वतीने माता रमाई यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते त्यांनी ‘त्यागमूर्ती माता रमाई जीवन आणि कार्य’ या विषयावर आपले मत मांडले याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते ताराचंद त्रिभुवन,नगरसेवक शैलेश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन,स़ंविधान युवा मंचचे जीवन पठारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन यांनी आज माता रमाई यांच्या त्यागाचा,संयमाचा ,पतीला प्रेरणा देणाऱ्या गुणांचा आदर्श अंगिकारण्याची आवश्यकता अधोरेखित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे माता रमाईच असल्याचे सांगितले पुढे आपल्या मनोगतात प्रा.डॉ.कसबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रवासात माता रमाई या केवळ सावली नव्हत्या तर त्यांना पदोपदी मानसिक बळ देणाऱ्या सहप्रवासी होत्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले असताना संसाराची संपूर्ण जबाबदारी माता रमाई यांनी एकट्याने सांभाळून गोवऱ्या थापून संसार चालवणे, स्वतः उपाशी राहूनही कुटुंबाची काळजी घेणे आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पैसे जपणे या त्यांच्या त्यागाच्या कथा समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले.भारतीय संविधानातील महिलांना देण्यात आलेले सर्वांगीण अधिकार त्यातून आजची घडत असलेली स्त्री ही संविधानाची देण असून संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचार कार्यामागे माता रमाईचीच प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेबांनी आपल्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेत व्यक्त केलेले हृदयस्पर्शी शब्द हे त्यांचा माता रमाईबद्दलचा असीम प्रेम व आदर दिसून येतो, माता रमाई यांच्यातील चारित्र्य ,संयम, सहनशीलता, आणि निःस्वार्थ सेवा या आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी तर आभार राजवीर त्रिभुवन यांनी मानले याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करण्यात आले
















