मुंबई, घाटकोपर: प्रतिनिधी
माता रमाबाई आंबेडकर नगर, गंधकुटी बुद्ध विहार घाटकोपर येथे दि.०७ एप्रिल शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून. माता रमाबाई आंबेडकर नगर येथे दरवर्षी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.ह्या जयंतीनिमत्त भव्य अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त परिमंडळ – ७, यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि नियमांचे पालन करत साजरी करावी असे आवाहन पोलिस उपायुक्त परिमंडळ-७ चे विजय सागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेला सुरूवात करताना पंतनगर पोलीस स्टेशनचे महिला पोलिस अधिकारी तृप्ती आठवले यांनी उपस्थितांना सुचना मांडण्याची विनंती केली.त्यावेळी पोलिस उपायुक्त परिमंडळ-७ चे विजय सागर यांनी सभेला मार्गदर्शन करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन केले. व उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. पुढे सभेला संबोधताना सर्व स्थानिक मंडळांना नियमाचे पालन व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता,कोणत्याही प्रकारची नशा न करता शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढावी व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
या बैठकीस पोलिस उपायुक्त परिमंडळ – ७ चे विजय सागर,पंतनगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवळे सोबत त्यांचे सहकारी अहिरे,तृप्ती आठवले,उमेश आव्हाड,रविकिरण आव्हाड ,पवार इतर पोलिस अधिकारी, व पत्रकार महेंद्र सुरडकर,मनोज कदम तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते चिंतामण भाई गांगुर्डे,मंगेश भाई पगारे,अरुण केदार,सोनवणे,अविनाश रघुनाथ कदम, विकास पवार,दीपक भोसले, प्रशांत तोरणे,संघदीप केदारे,उदय कांबळे,राम तुपेरे, राजु खरात,चंदन निकाळजे सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरीक,कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.
बैठकीस उपस्थित नेते मंडळी व मंडळाचे कार्यकर्ते आदींनीही आपले मनोगत व्यक्त करून, मिरवणूक व विविध कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचा निर्धार यावेळी करत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणत करण्यात आली.